शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
5
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
6
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
7
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
8
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
9
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
10
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
11
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
12
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
13
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
14
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
15
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
16
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
17
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
18
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
19
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
20
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर

सांगलीत ‘वसंतदादा’समोर गुरुवारपासून ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 00:30 IST

सांगली : दत्त इंडिया कंपनीच्या व्यवस्थापनाने वसंतदादा साखर कारखान्यातील दि. १ जुलैपूर्वीची कुठलीही देणी आम्ही देणे लागत नाही,

ठळक मुद्देबैठकीत निर्णय : ‘दत्त इंडिया’ विरुध्द सेवानिवृत्त कामगार आक्रमक हे आंदोलन वाढवण्याचा प्रयत्न केल्यास सेवेतील कामगारही संपात व्यवस्थापनाने चुकीची भूमिका घेतल्यास आणखी तीव्र आंदोलन

सांगली : दत्त इंडिया कंपनीच्या व्यवस्थापनाने वसंतदादा साखर कारखान्यातील दि. १ जुलैपूर्वीची कुठलीही देणी आम्ही देणे लागत नाही, अशी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे सेवानिवृत्त कामगार शनिवारी संतप्त झाले. देणे लागत नाही, तर वसंतदादा कारखान्याचा बॉयलर आणि यंत्रसामग्री का वापरता, असे विचारत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. त्यानंतर कामगारांनी दि. ९ नोव्हेंबरपासून दत्त इंडिया कंपनीच्या कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या मारण्याचा निर्णय घेतला.

वसंतदादा कारखान्यातील सुमारे सातशे सेवानिवृत्त कामगारांचा थकीत फंड आणि ग्रॅच्युईटीच्या प्रश्नावर येथील कामगार भवनमध्ये शनिवारी बैठक झाली. बैठकीस अ‍ॅड. के. डी. शिंदे, श्रीकांत देसाई, घनशाम पाटील, विष्णू माळी, विलास पाटील, प्रदीप शिंदे आदी प्रमुख उपस्थित होते. या बैठकीत सेवानिवृत्त कामगारांच्या प्रश्नांवर प्राथमिक चर्चा झाल्यानंतर सर्व कामगार वसंतदादा कारखाना चालवण्यास घेतलेल्या दत्त इंडिया कंपनीच्या मुख्य गेटजवळ गेले. तेथे कामगारांनी ‘देणी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’, ‘सेवानिवृत्त कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे’ अशी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. यावेळी दत्त इंडिया कंपनीच्या प्रशासनाने सांगितले की, आम्ही जिल्हा बँकेशी करार केला असून, त्यामध्ये दि. १ जुलै २०१७ पूर्वीची कोणतीही देणी देणे लागत नाही.

व्यवस्थापनाने कामगारांसमोर करारपत्रच ठेवले. व्यवस्थापनाच्या भूमिकेमुळे सेवानिवृत्त कामगार आणखी संतप्त झाले. दि. १ जुलैपूर्वीची तुम्ही काही देणी देणार नसाल तर, कारखान्याचा बॉयलर आणि यंत्रसामग्री तुम्ही कशासाठी वापरता? कारखान्याकडून आम्हाला आमच्या हक्काची देणी मिळाली पाहिजेत, यासाठी आमचा लढा चालू आहे. व्यवस्थापनाने चुकीची भूमिका घेतल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अ‍ॅड के. डी. शिंदे यांनी दिला.कामगारांचा आक्रमक पवित्रा पाहून दत्त इंडियाच्या व्यवस्थापनाने लवचिक भूमिका घेतली. कारखान्यामध्ये पुन्हा बैठक झाली. यावेळी वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, दत्त इंडियाचे संचालक जितेंद्र धारू, उपाध्यक्ष मृत्युंजय शिंदे, सेवानिवृत्त कामगारांचे प्रतिनिधी अ‍ॅड. शिंदे, प्रदीप शिंदे आदी उपस्थित होते. व्यवस्थापनाने नरमाईची भूमिका घेत जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांची वेळ घेऊन बैठक घेण्यात येईल. बैठकीत जो निर्णय होईल, त्यानुसार कामगारांची देणी दिली जातील, असे आश्वासन दिले.

दत्त इंडिया कंपनीने थकीत देण्याचा चेंडू जिल्हा बँकेच्या कोर्टात टोलविल्यामुळे सेवानिवृत्त कामगार आक्रमक झाले आहेत. दत्त इंडिया आणि जिल्हा बँक काय निर्णय घ्यायचे ते घेऊ देत, आम्ही दि. ९ नोव्हेंबरपासून दत्त इंडियाच्या कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या मारणार आहोत. देणी दिल्याशिवाय हलणार नाही. हे आंदोलन वाढवण्याचा प्रयत्न केल्यास सेवेतील कामगारही संपात उतरतील, असा इशारा अ‍ॅड. के. डी. शिंदे आणि कामगार युनियनच्या पदाधिकाºयांनी दिला आहे.थकीत देणी एकरकमीच पाहिजेतसेवानिवृत्त कामगारांची देणी मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे एकाचवेळी ही देणी न देता अन्य देणेकºयांप्रमाणे टप्प्या-टप्प्याने ती देण्याबाबतची चर्चा झाली. दहा टप्पे पाडून देण्यावर दत्त इंडिया कंपनीचे प्रशासन तयार आहे. पण, सेवानिवृत्त कामगारांनी त्यास तीव्र विरोध करून थकीत देणी एकरकमीच मिळाली पाहिजेत, अशी ठोस भूमिका घेतली आहे, अशी माहिती अ‍ॅड. शिंदे यांनी दिली.

टॅग्स :StrikeसंपOrder orderआदेश केणे